आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या स्पर्धेमुळे अनेकजण जगण्याचा आनंद घेवू शकत नाही. कामाचा हा व्याप कधी-कधी आपल्याला नैराश्याकडे सुद्धा घेवून जाऊ शकतो. अशावेळी जीवन अस्ताव्यस्थ होण्याची शक्यता असते. म्हणूनच नैराश्यापासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे.
ही काळजी घ्या
१. कष्ट करून जे मिळत आहे. त्यामध्ये समाधान मानण्याची नितांत गरज असते. कारण जे आपल्याला सहज मिळते ते इतरांसाठी स्वप्न असू शकते. जे समाधानी नसतात अशा लोकांना कधीच आनंद मिळू शकत नाही.
२. इतरांशी स्वत:ची तुलना करू नका, कारण दोन माणसे कधी एकसारखी असू शकत नाहीत. तुलना केल्याने आपण स्वत:ला छोटे करतो.
३. सफलतेची सुरुवात प्रामाणिकपणामुळेच होते. म्हणून स्वत:शी प्रामाणिक राहावे. मानसिकता तयार करून एखाद्या गोष्टीसाठी जोखीम घेणे वाईट नाही.
४. कुणावरही एवढेही प्रभावित होऊ नका की, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्वत: विचार करूनच निर्णय घ्या.
५. कुटुंबासोबत छोटे-छोटे आनंद साजरे करा. आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवा.
६. अनावश्यक व्यस्तता टाळा. नियमितपणा ठेवून काम करा आणि त्यात आरामाकडेही लक्ष द्या.
* सकारात्मक बाबींचा विचार करा. प्रत्येक यशाची सुरुवात संघर्षातूनच होते.