आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आजकाल आपण पाहिले आहे की, मोठ्या-मोठ्या ऑफिसमध्ये चारही बाजुने बंद असते आतमध्ये बाहेरची हवा आजिबात येत नाही. हवेला येण्यासाठी थोडीही जागा नसते. सगळ्यांना अशा बंद जागेत बसून काम करण्याची सवय झालेली असते. पण हे कितपत योग्य आहे. आपण याकडे लक्ष देता का ? याचा आपण कधी विचार करत नाही.
ऑफीसमध्ये सगळीकडे एसी लावलेले असतात. त्यामुळे सगळीकडे थंड वातावरण असते. नैसर्गिक हवा आपल्या आतमध्ये नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडू शकते. याकडे सर्वजण दुर्लक्ष करतात. जर ऑफिसमध्ये नैसर्गिक हवा येत नसेल कर ही चिंतेची बाब आहे.
एका वृत्तसंस्थेने माहिती दिल्यानूसार, ऑफिसमध्ये नैसर्गिक हवा न आल्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडू शकते. ऑफीसमध्ये व्हेंटिलेशन न होत असल्याकारणाने कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. ज्याचा फार वाईट प्रभाव पडतो.
व्यक्ती त्याच वातावरणात राहू शकतो. जिथे ऑक्सिजन असेल. जेणेकरुन आपण सहजपणे श्वास घेऊ शकतो. कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरु शकते. रुममध्ये कार्बन डायऑक्साइड आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरु शकत. रुममध्ये कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण असेल तरी सुद्धा श्वास रोखला जाऊ शकतो. याने मेंदूला मिळणाऱ्या ऑक्सिजनमध्ये अडथळा निर्माण केला जाऊ शकतो.
शरीरातील अंतर्गत अंगापर्यंत ऑक्सिजन कमी पोहचणे, व्यक्तीच्या बुद्धीमत्तेवर प्रभाव टाकते. एव्हायनरमध्ये प्रोटेक्शन एजन्सीनुसार, बंद रुममध्ये प्रदुषणाचे प्रमाण २ ते ५ पटीने अधिक वाढू शकते. या प्रदुषणामुळे ह्रदय आणि फुफुसासंबधी आजारांचा धोका अधिक वाढतो. तसेच यामुळे अकाली मृत्यूचा धोका देखील असू शकतो.
या रिपोर्टनुसार, शरीरातील अंतर्गत अंगांपर्यंत ऑक्सिजन कमी पोहोचणे, व्यक्तीच्या बुद्धीमत्तेवर प्रभाव टाकतं. एन्व्हायनरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीनुसार, बंद रूममध्ये प्रदूषणाचं प्रमाण २ ते ५ पटीने अधिक वाढू शकतं. या प्रदूषणामुळे हृदय आणि फुप्फुसासंबंधी आजारांचा धोका अधिक वाढतो. तसेच यामुळे अकाली मृत्यूचा धोका देखील असतो.