आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कामाचा दबाव तसेच कौटुंबिक जीवनामुळे ३५ व्या वर्षाच्या तुलनेत २५ व्या वर्षी महिला जास्त आनंदी असतात. २० ते २५ वयापर्यंत त्या आपला लूक, वजन आणि सार्वजनिक जीवनाबाबत सजग असतात. मात्र, ३० नंतर त्या याविषयी गांभीर्याने विचार करू लागतात. दर पाच महिलांपैकी एक महिला तणावामुळे आनंदी नसते, असे एका संशोधनात आढळून आले आहे. महिलांना केंद्रस्थानी ठेवत हे संशोधन करण्यात आले. यासाठी दोन हजार महिलांवर संशोधकांनी अभ्यास केला.
महिलांच्या तणावाची १० कारणे
१ पुरेशा पैशाचा अभाव
२ कुटुंबाची चिंता
३ आरोग्य
४ मुले
५ चांगले कौटुंबिक जीवन
६ आकर्षण
७ सौंदर्य
८ करिअर
९ मित्रांसाठी पुरेसा वेळ
१० वजन वाढणे
१५ टक्के महिलांनी कुटुंबाला आणि मित्रांना क्वालिटी टाइम न देऊ शकणे हे तणावाचे कारण या संशोधनात सांगितले आहे. ५३ टक्के महिलांमध्ये वाढते वजनदेखील तणावाचे कारण होते. आयुष्य चांगले करण्यासाठी महिला जास्त पैसे कमावण्यासाठी प्राधान्य देतात.