पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – ज्यावेळी दोन्ही डोळ्यांची एकत्रितपणे काम करण्याची क्षमता कमी होते. किंवा संपते त्यामुळे बुबुळं एका सरळ रेषेत दिसत नाहीत. त्याला तिरळेपणा म्हणतात. अशावेळी एक डोळा आत, बाहेर, वर किंवा खाली वळलेला दिसतो. भारतामध्ये तिरळेपणाचं प्रमाण ३ ते ५ टक्के आहे. लहानपणी होणारा हा आजार आहे. त्यामुळे हा सहाव्या महिन्यापासून तिरळेपणाला सुरुवात होऊ शकते. काही कुटुंबांमध्ये तिरळेपणा हा अनुवंशिकतेनं दिसतो.
का येतो तिरळेपणा
१) दोन्ही डोळ्यांना एकत्रित ठेवण्याची मेंदूची क्षमता कमी झाल्यास तिरळेपणाला सामोरे जावे लागते.
२) चष्म्याचा नंबर असेल तर तिरळेपणा येऊ शकतो.
३) आपली नजर कमी झाली तर तिरळेपणा येऊ शकतो.
४) आनुवंशिकता म्हणजे घरात जर अगोदरच कोणाला तिरळेपणा असेल तर घरातील दुसऱ्या पिढीलाही येऊ शकतो.
५) असंतुलित स्नायुशक्ती व डोळयास होणारा कमी रक्तपुरवठा यामुळे देखील तिरळेपणा येतो.
६) मोतीबिंदुमुळे निर्माण होणारी पुसट प्रतिमा, बुबुळावरील व्रण, आंतरपटलाचे रोग, दृष्टीदोष, डोळयात गाठ असणे या करांमुळेही तिरळेपणा येतो.
अशी करतात शस्रक्रिया
१) समांतर कक्षात नसलेले डोळे शस्त्रक्रियेने योग्य दिशेत आणता येतात.
२) शस्त्रक्रिया पूर्ण भूल देऊन किंवा फक्त डोळयांस भूल देऊन केली जाते.
३) परंतु, ज्याची शस्त्रक्रिया करायची आहे त्या मुलास सर्दी, ताप, खोकला हे आजार सारखे नसावेत.
४) शस्त्रक्रिया डोळयाच्या पांढऱ्या भागात केली जाते.
५) शस्त्रक्रियेनंतर जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागत नाही.
६) जरी शस्त्रक्रिया झाली असेल तरीही चष्मा वापरावच लागतो.