आरोग्यनामा टीम – काजू खाल्ल्यानं शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. याबद्दल अनेकांना माहिती नाहीये. यात अनेक पोषकतत्व असतात. आज आपण काजू खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत. यानं अनेक मोठे आजारही दूर राहतात.
1) ताण-तणाव आणि मासिक पाळी – काजूमध्ये आयर्न आणि ओमेगा 3 चं प्रमाण जास्त असतं. यामुळं मुड चांगला राहतो. यात असणाऱ्या व्हिटॅमिन बी आणि अँटीऑक्सिडंटमुळं मेंदूसोबतच त्वचेलाही फायदा होतो. यामुळं ताण तणाव दूर होतो. मासिक पाळीतही यानं मुड चांगला राहतो. डिप्रेशनसाठीही याचा फायदा होतो.
2) डोकेदुखी – काजू खाल्ल्यानं मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास कमी होतो. यामुळं स्मरणशक्ती आणि एकाग्रताही वाढते. आजच्या काळात ही समस्या जास्त उद्भवताना दिसते.
3) त्वचा उजळते – काजू पाण्यात भिजवून बारीक करून यानं मसाज केली तर त्वचा उजळते. ऑईली किंवा ड्राय अशा प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी काजू फायदेशीर आहे. त्वचा जर तेलकट असेल तर काजू रात्रभर दूधात भिजवावेत. सकाळी बारीक करून घ्यावेत त्यात मुलतानी माती, लिंबू किंवा थोडे दही मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. यानं खूप फायदा होतो.
4) डोळ्यांसाठी मोठा फायदा – काजूमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि लुटेन अशा घटकांचा डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप फायदा होतो. याच्या सेवनानं सूर्य किरणांपासूनही डोळ्यांचं सरंक्षण होतं.
5) कॅन्सरसह इतर मोठ्या आजारांपासून बचाव – काजूचं सेवन केलं तर शरीरात कॅन्सरच्या पेशी पसरत नाहीत. यामुळं लिव्हर आणि ब्रेस्ट कॅन्सरसारखे आजारही दूर राहतात. काजूमध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यानं कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं. रक्तदाब, लठ्ठपणा यावरही काजू लाभदायी आहे. काजुच्या सेवनामुळं रक्ताभिसरण सुरळीत होतं.