आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्रदुषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने दम्यासारखे श्वसनाचे आजारही वाढत आहेत. जगभरात दम्याच्या आजाराचे रूग्ण दरवर्षी वाढत आहेत. दमा या आजारात रूग्णाने खुप काळजी घेणे गरजेचे असते. विविध प्रकारच्या अॅलर्जीने दम्याचा त्रास वाढतो. मात्र, दम्यासारखा आजार होऊ नये यासाठी काळजी घेणे कधीही चांगले ठरू शकते.अनेकदा काही लक्षणे, संकेत आपल्याला शरीराकडून मिळत असतात. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. एखाद्या वेळेस सर्दी झाली तर आपण खूप गांभीर्याने घेत नाही. सामान्य आजार आहे असे समजून दुर्लक्ष करतो. परंतु, या सर्दीचे रूपांतर दम्यात होऊ शकते.
देशात सध्या दम्याचे दीड कोटीपेक्षा जास्त रुग्ण असून २०२५ पर्यंत जवळपास १० कोटी लोक दम्याने पीडित असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लहान मुलेही वेगाने दम्याच्या आजाराला बळी पडत आहेत. दमा हा आजार कोणत्याही वयात होतो. १५ वर्षांच्या वयापासून सुरू होऊ शकतो. या आजाराचे सर्वात मोठे म्हणजे त्याचे लक्षण केवळ सर्दी-पडसे मानून त्याकडे दुर्लक्ष करणे होय. त्यामुळे तीच सर्दी पुढे दम्यात रूपांतरित होते.
मुलांना दम लागण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, त्यांच्या लक्षात येत नाही. मुलांवर वेळीच उपचार केल्यास संभाव्य धोक्यापासून बचाव होऊ शकतो. ज्या रुग्णांना दम्याचा झटका येतो, त्यांच्यासाठी रेडिओ वेव्ह सर्जरी लाभदायक ठरू शकते. ती श्वासोच्छ्वासात येणारे अडथळे दूर करून श्वास घेणे सोपे करते. या शस्त्रक्रियेसासाठी एक तास लागतो. औषधांचा उपयोग होत नसल्यास ही सर्जरी करण्यात येते.