आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सुगंधी असलेली छोटी विलायची गरम मसाल्यात वापरली जाते. अनेक गोडपदार्थांमध्ये सुद्धा तिचा मोठ्याप्रमाणात वापर होतो. शिवाय, तिचे अनेक आरोग्य फायदे सुद्धा आहेत. कफ, खोकला, अस्थमा, मूळव्याध, हृदयरोग आणि गळ्यातील जळजळ यावर ती गुणकारी आहे. विलायची खाऊन त्यावर गरम पाणी प्यायल्यास याचे दुप्पट फायदे होतात. रात्री विलायची खाऊन गरम पाणी प्यायल्यास कोणकोणते फायदे होतात, ते जाणून घेवूयात.
रक्ताभिसरण
रात्री दोन विलायची खाऊन एक ग्लास गरम पाणी प्यायल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. रक्त शुद्ध होते. त्वचा निरोगी राहते.
पोटाचे आजार
पोटातील गॅस नष्ट होतो. पचनशक्ती वाढते. पोटाची सूज कमी होते. छातीमधील जळजळ थांबते.
पाट कमी करा
ही शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपयोगी आहे. यात फायबर आणि कॅल्शियम असल्याने पोट कमी होते, तसेच वजन कमी होते. रात्री विलायची खाऊन त्यावर गरम पाणी प्या
केसगळती
रात्री दोन विलायची खाऊन पाणी पिल्याने केस मजबूत होतात. केसगळती थांबते. कोंडा दूर होतो.
स्पर्म काउंट
स्पर्म काउंट वाढविण्यासाठी हा उपाय रामबाण आहे. यासाठी रात्री विलायची खाऊन गरम पाणी प्या.