आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्रदूषण समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारसह सामान्य जनताही गंभीर नसल्याचे विदारक चित्र भारतात आहे. याचा परिणाम म्हणून येथे लाखो मुलांना जीव गमवावा लागत आहे. आरोग्यावर प्रदुषणाचे गंभीर परिणाम होत आहेत. सेंटर ऑफ सायन्स अँन्ड एन्व्हायर्नमेंटने एक अहवाल प्रसिद्ध केला असून यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, देशात दरवर्षी १ लाख लहान मुले प्रदूषित हवेमुळे पाच वर्षाच्या आतच जीव गमावत आहेत.
Air Pollutionमुळे देशात ५ वयापेक्षा कमी वयाच्या दर १० हजार मुलांपैकी सरासरी ८ पेक्षा अधिक लहान मुलांचा मृत्यू होत आहे. मुलींमध्ये हे प्रमाण अधिक जास्त आहे. दरवर्षी दर १० हजार मुलींपैकी सरासरी ९ पेक्षा अधिक मुलींचा त्या पाच वर्षांच्या होण्याआधीच प्रदूषणामुळे मृत्यू होत आहे. जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून स्टेट ऑफ इंडिया एन्व्हायर्नमेंट-२०१९ चा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात म्हटले आहे की, भारतात प्रदूषणामुळे १२ टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू होतो. यामुळे २०२० पर्यंत भारतात १५ ते १६ मिलियन इ-व्हेइकल आणण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. ८६ वॉटर बॉडीज गंभीर प्रदूषणाच्या जाळ्यात आहेत.
सर्वात जास्त जलप्रदूषण कर्नाटक, तेलंगणा आणि केरळमध्ये आहे. २०११ ते २०१८ कालावधीत या राज्यांमध्ये प्रदूषित इंडस्टींची संख्या साधारण १३६ टक्क्यांनी वाढली आहे. कचरा व्यवस्थापन ही आपल्याकडील सर्वात मोठी समस्या आहे. मागील ३ वर्षांमध्ये २२ राज्यांमध्ये ७९ मोठी आंदोलने लँडफिल साइट आणि डंप यार्डबाबत झाली आहेत.जगभरात दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी असून येथे सर्वात जास्त शाळा आहेत. टॅफिक प्रदूषणमुळे नोव्हेंबरमध्ये येथील शाळांच्या आजूबाजूचे प्रदुषण वाढते.