आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हल्ली सिझन नसताना देखील सगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध होतात. मात्र सर्वच भाज्या सर्वच ऋतूत खाणे शरीरासाठी योग्य नाही. कोणत्या ऋतूत कोणत्या भाज्या खाव्यात, याविषयी माहिती खालीलप्रमाणे –
पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाव्यात –
भेंडी, ढोबळी मिरची, वांगी, टोमॅटो यांसारख्या फळभाज्या पावसाळ्यात खाणे योग्य ठरेल. या भाज्या कॅन्सरप्रतिरोधी अँटिऑक्सिडंट असल्याने फायदेशीर; परंतु ज्यांना किडनी विकार आहेत त्यांनी ह्या भाज्या खाऊ नये. त्याचप्रमाणे लाल, दुधीभोपळा, कारले, पडवळ, दोडका या वेलभाज्या पावसाळ्यात खाव्यात.
हिवाळ्यात ‘या’ भाज्या खाव्यात –
शेवगा, मटार, घेवडा, गवार, वाल-पावटे अशा शेंगभाज्या खाण्यासाठी हिवाळा योग्य ऋतू आहे. मेथी, पालक, शेपू, राजगिरा, माठ या पालेभाज्या पावसाळ्यात खाव्यात.
उन्हाळ्यात ‘या’ भाज्या खाव्यात –
लाल,दुधीभोपळा, कारले, पडवळ, दोडका यांसारख्या खाव्यात. वेलभाज्या कांदा, लसूण, बटाटा, सुरण, रताळे, बीट यांसारख्या कंदभाज्या उन्हाळ्यात खाणे लाभदायी असते. मधुमेहींनी बटाटा, रताळे, बीट खाऊ नये. मेथी, पालक, शेपू, राजगिरा, माठ या पालेभाज्या उन्हाळ्यात खाणे फायदेशीर असते. किडनी विकार असणाऱ्यांनी मात्र या भाज्या टाळाव्यात.