आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जास्त वेळ शूज घातल्यानंतर अनेक लोकांच्या पायांना दुर्गंधी येते. त्यामुळे बरेच लोक शूज घालणे टाळतात. शूज काढल्यानंतर दुर्गंधी येणे हे कधीकधी लाजिरवाणे ठरते. ही समस्या भेडसावत असल्यास त्यावर एक साधा आणि सोपा उपाय आहे. कांद्याचा उपाय करून ही समस्या दूर करता येते. याविषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.
हे उपाय करा
१ रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवून पायमोजे घाला. कांद्याच्या छोट्या चकत्या करून त्या पायमोज्यांत घाला. यामुळे दुर्गंधी येणे बंद होईल. कांदा सॉक्समध्ये टाकून झोपल्याने तुम्हाला अनेक फायदेही होतील.
२ कांद्यातील अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी वायरल तत्त्वांमुळे शरीर निरोगी ठेवते. शरीरातल्या घातक जिवाणू आणि किटाणूंचा नाश होतो. कांद्यामधील फॉस्फरिक अॅसिड रक्तामध्ये शोषले जाते आणि रक्तशुद्धी होते.
३ कांद्याच्या उग्र वासामुळे खोलीतील हवा शुद्ध होते आणि पायांची दुर्गंधी दूर होते. घातक रसायने आणि विषारी तत्त्व शरीराबाहेर टाकली जातात.
४ यामुळे हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.
५ या उपायामुळे पोटातील संसर्ग दूर होतो. किडनीशी संबंधित समस्या दूर होतात.
६ या उपायामुळे छोट्या आतड्याच्या तसेच मूत्राशयाच्या समस्याही दूर होतात.
७ शरीरातील अधिक उष्णता असणारांनी हा करावा. यामुळे अतिरिक्त उष्णता शोषली जाते. उष्णतेचा त्रास कमी होतो.
८ त्वचेजवळ कांद्याच्या चकत्या असल्याने शरीराचे तापमान वाढत नाही. ताप आला असल्यास उतरतो.