हे विकार होतात
पोटाच्या सर्व रोगांचे मूळ कारण हे मंद झालेला अग्नी हेच असते. त्यामुळे अजीर्ण, अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, आमांश, अल्सर, मुळ्व्याध, भगंदर, पित्ताशयामध्ये खडे, अल्सरेटीव कोलायटिस, कावीळ, जलोदर, लिव्हरसिरॉसिस, ग्रहणी, इर्रीटेबल बोवेल यांसारखे अनेक विकार होतात.
अशा विकारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये अन्न बिलकूल घ्यावेसे न वाटणे, मळमळ व उलटी होणे, थोड्याशा आहारानेही पोट गच्च झाल्यासारखे वाटणे, जास्त प्रमाणात गॅसेस होणे, तोंडाची चव कडू किंवा आंबट पडणे, करपट ढेकर, छातीमध्ये व घशात जळ जळ होणे, पोटात दुखून येणे, उलटीतून पिवळट रंगाचे पित्त बाहेर पडणे, शौचास चिकट होणे, बैचेनी, पोट पूर्ण साफ न होणे, पुन्हा पुन्हा शौचास जाण्याची इच्छा होणे, शौचाच्या वेळी पोटात कळ येणे अशी लक्षणे दिसून येतात.
तपासण्यांचा उपयोग नाही
पोटाच्या काही तक्रारींमध्ये रक्त तपासण्या व सोनोग्राफी, गस्टड्ढोस्कोपी, कोलोनोस्कोपी, सी.टी. एंटरोग्राफी या तपासण्यांचा उपयोग होत नाही. पोटाच्या बहुतेक विकारांमध्ये शरीरात रचनात्मक बदल होत नाहीत हे बदल फक्त क्रियात्मक असतात यामुळे कितीही प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या केल्यात, सोनोग्राफी, गस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, सी.टी. एंटरोग्राफी या तपासण्यांमधून देखील काहीच निष्पण्ण होत नाही.
फक्त लक्षणांनुसार तात्पुरते औषधी उपचार करत राहिल्याने हे आजार वर्षानुवर्षे तसेच राहतात व बळावतात. यातूनच पुढे ग्रहनी हा आजार उद्भवतो. यात कधी जुलाब होतात तर कधी मलावरोध होतो, जेवल्यावर लगेच शौचास जाण्याची इच्छा होते, अंग गरम असणे, पोटात जड वाटणे, आव पडणे, रक्त पडणे, अशक्तपणा वाटणे, उत्साह नसणे अशी लक्षणे प्रामुख्याने दिसतात.
आयुर्वेदिक उपाय करावेत
अशा विकारांची चिकित्सा करताना लाक्षणिक चिकित्सा करण्यापेक्षा मूळ कारणाची म्हणजेच जाठराग्नीची चिकित्सा करणे गरजेचे असते. अशा आजारांची पाश्र्वभूमी खूप जुनी असल्याने फरक पडण्यास देखील वेळच लागतो. आयुर्वेद चिकित्सेने या आजारांचे मुळापासून उच्चाटन होते.
अपथ्यकर आहार
पिचण्यास जड पदार्थ, जंक फुड, फास्ट फुड, आंबवून तयार केलेले इडली, डोसा, उत्तप्पा, पाव इत्यादी पदार्थ, पापड, लोणचे, मिसळ-वडापाव, भजी-समोसा-वडे यांसारखे तळलेले पदार्थ, तूर डाळ, शिळे अन्न, थंड पदार्थ व पेय, दही, आंबट पदार्थ, डालडा तूप, मसाल्याच्या भाज्या
वाईट सवयी
जेवताना टी.व्ही व मोबाइल बघणे, खूप घाईने जेवणे व तणावयुक्त वातावरणात आहार घेणे, जेवणापूर्वी किंवा नंतर चहा अथवा कॉफी घेणे, तंबाखू, सिगारेट, गुटखा इत्यादी सवयी, जेवणानंतर स्नान करणे, जेवण झाल्यावर लगेच खूप पाणी पिणे, अवेळी जेवण, रात्री जागरण, दिवसा झोपणे इत्यादी सवयी वाईट आहेत.
पथ्यकर आहार
उष्ण व ताजा व कमी तेलयुक्त आहार, पचण्यास हलके पदार्थ, गाईचे तूप, दूध, मूग, डाळ, शेवगा, जुने धान्य- गहू-तांदूळ याचा वापर करणे, ताक, कढीपत्ता, भोपळा, डांगर, भूकेनंतरच आहार घेणे इत्यादी.