आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरात शुद्ध आणि जास्त रक्त असणे नेहमी चांगलेच असते. यामुळे आपण निरोगी असतो. जर तुमच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असेल किंवा त्यातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर आता चिंतेचा विषय नाही. कारण आम्ही तुम्हाला आता अशा एका पदार्थाबद्दल सांगणार आहोत ज्याच्या सेवनाने तुमच्या शरीरात कधीच रक्ताची कमी भासणार नाही.
जर तुम्हाला वाटत असेल की हा पदार्थ खूप महाग असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण हा पदार्थ प्रत्येकांच्या घरात असतो. तो म्हणजे ‘पांढरा तीळ’. पांढरा तीळ रक्तवाढी साठी खूपच उपयुक्त असतो. पांढऱ्या तिळाचा सेवन दरदोज सकाळी रिकाम्या पोटी केल्याने १५ दिवसातच तुम्हाला याचा परिणाम दिसायला सुरुवात होईल.
पांढऱ्या तीळा मध्ये आयर्नचे प्रमाण खूप जास्त असल्याने रक्त वाढवण्यात खूपच उत्तम पदार्थ आहे. पांढऱ्या तिळ शरीरात रक्त बनवण्यासाठी खूप चांगला पदार्थ मानला जातो. पांढऱ्या तिळाच्या सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते.
सेवन कसा करावा
१. याचे सेवन करण्यासाठी रात्री मूठ भर पांढरे तीळ भिजत टाकावे.
२. सकाळी उठल्यावर याचा रिकाम्या पोटी सेवन करावे.