आरोग्यनामा ऑनलाइन टीम – टाळी वाजवण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. नियमित १० मिनिटे टाळी वाजवली तर शरीरातील कोलेस्टड्ढॉल कमी होते आणि रक्ताभिसरण सुधारते. आश्चर्य म्हणजे या साध्या उपायामुळे हृदयरोग आणि उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजारांचा धोका दूर होऊ शकतो. टाळी वाजवल्यामुळे आरोग्याला कोणते फायदे होतात याविषयी माहिती घेवूयात.
१ नियमित टाळी वाजवल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रित होतात. यामुळे हृदरोग होत नाहीत.
२ यामुळे चरबी घटते, वजन कमी होते.
३ शरीराचे रक्ताभिसरण चांगले होते. उच्च रक्तदाब होत नाही.
४ रोग प्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होत नाहीत.
५ शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने फुफ्फूस निरोगी होतात.
६ शरीरात विशिष्ट हार्मोन्स रिलिज झाल्याने चांगली झोप लागते.
७ मानसिक ताण कमी होतो. यामुळे डोकदुखी दूर होते.
८ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे डायबिटीज होत नाही.
९ मेंदू सक्रिय झाल्याने स्मरणशक्ती वाढते.
१० डायजेशन सुधारल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.