आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खाणेपिणे आणि जीवनशैलीमुळे मूळव्याधीची समस्या उद्भवते. तसेच अनुवांशिकतेमुळेही हा त्रास होऊ शकतो. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या आतील भागातील अशुद्ध रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म जाळे तेथील आंतरवर्णासह सैल सुटते त्या वेळी हाताला कसला तरी कोंब किंवा मोड लागतो. अनेकदा वेदना व रक्तस्राव होतो. यास मूळव्याध असे म्हणतात. हा आजार कोणत्या कारणांमुळे होतो आणि यावरील आयुर्वेदिक उपाय कोणते आहेत, याविषयी आपण माहिती घेवूयात.
मलबद्धता हे या रोगाचे प्रमुख कारण आहे. मलप्रवृत्ती कडक झाल्यास जोर लावल्याने गुदद्वाराच्या जागी चिरा पडतात आणि हा रोग होतो.
मुळव्याधीचे दुसरे कारण प्रवाहिका हे आहे. आव मलप्रवृत्ती हे या रोगाचे दुसरे महत्त्वाचे कारण पोटात मुरडा येऊन चिकट फेसाळ मलप्रवृत्ती होते. हे प्रवाहिकेचे प्रमुख लक्षण आहे. रुग्णाला ४-५ वेळा शौचास जावे लागते. यामुळे मोठ्या आतड्यासह गुदद्वाराची जागा अलवार होते. गुदद्वाराच्या ठिकाणी सूज येते. आणि जखमा तयार होतात. तसेच बहुतांश मूळव्याध रुग्णांना फिशरचा त्रास असतो. मूळव्याधीची गाठ व सोबत मलबद्धता परिणामी फिशर तयार होेते. प्रसूतीच्या वेळी गुदमार्ग ताणला जाऊन व्रण होतात, यामुळेही मुळव्याधीचा त्रास होऊ शकतो.
मुळव्याधीवर अनेक आयुर्वेदिक उपाय आहेत. त्यापैकी काही उपायांची आपण माहिती घेऊ. कारल्याच्या बियांची पावडर आणि मध व्हिनेगरसोबत मिसळून कोंबावर लावल्याने २० दिवसांत ते सुकून जातात. तसेच कच्चा कांदा मंद आचेवर भाजून घेऊन त्याची पेस्ट बनवून कोंबावर लावल्याने काही दिवसांतच फरक पडतो. चहाच्या पानांची बारीक पेस्ट बनवूप आणि गरम करून कोंबावर लावल्याने काही दिवसांतच कोंब सुकून जातो. मूठभर काळे तीळ एक वाटी दह्यासोबत नियमित खाल्ल्याने मूळव्याधीच्या समस्येपासून आराम मिळतो. मेंदीचे पाने पाण्यात बारीक करून याची पेस्ट कोंबावर लावल्याने काही दिवसांतच कोंब सुकून जातात.
मूठभर काळे तीळ एक वाटी दह्यासोबत नियमित खाल्ल्याने मूळव्याधीच्या समस्येपासून आराम मिळतो. मेंदीचे पाने पाण्यात बारीक करून याची पेस्ट कोंबावर लावल्याने काही दिवसांतच कोंब सुकून जातात. कडूलिंबाचे पान तुपामध्ये भाजून त्यामध्ये थोडेसे कापूर टाकून मूळव्याधीच्या कोंबावर लावावे. आणखी एक उपाय म्हजणे अर्धा चमचा हरड पावडर रोज कोमट पाण्यासोबत घेतल्याने मूळव्याधीत बराच आराम येतो. रुईच्या दुधामध्ये हळद पावडर मिसळून कोंबावर लावल्यास काही दिवसात कोंब सुकून जातात. तसेच मिरपूड आणि काळ्या जिऱ्याची अर्धा चमचा पावडर रोज मधासोबत घेतल्याने मूळव्याधीपासून आराम मिळतो. दुधी भोपळ्याची पाने बारीक करून मूळव्याधीच्या कोंबावर नियमित लावल्याने काही दिवसातच आराम मिळतो. तुळशीचे पान पाण्यासोबत बारीक करून कोंबावर लावल्याने जळजळ थांबते.