आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे तर सगळ्यांनाच माहित असेल. तांब्याच्या भांड्याचे अनेक फायदे आपल्याला माहीतच असेल. पण तुम्हाला हे माहित आहे का, की काही असे पदार्थही आहेत जे तांब्याच्या भांडयात ठेऊन खाल्याने आपल्याला विषबाधा होऊ शकते. खरं तर या भांड्यात कॉपर धातू असल्याने हे काही अन्न पदार्थांबरोबर मिसळून रिएक्ट होतो. या क्रियांमुळे या भांड्यात ठेवलेले अन्न खाल्याने अन्न विषबाधा(फूड प्वाइजनिंग) होण्याची शक्यता असते. तर चला पाहुयात असे कोणते पदार्थ आहेत ज्याचा सेवन आपण तांब्याच्या भांड्यात ठेवला असेल तर करू नये
१. दूध
चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध कधी ठेऊ नये. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले दूध हे विषारी बनते. जर तुम्ही हे दूध पिलात तर तुम्हाला अन्न विषबाधा(फूड प्वाइजनिंग) होण्याची शक्यता असते.
२. दही
दही शरीरासाठी एक उत्तम पदार्थ म्हणून ओळखला जातो. पण हेच दही जर तांब्याच्या भांड्यात ठेवला असेल तर तो विषारी बनतो. तांब्याच्या भांड्यात असणारे घटक आणि दहीत असणारे घटक यांच्यात रासायनिक प्रक्रिया होते. जर हे दही खाल्यास अन्न विषबाधा(फूड प्वाइजनिंग) होण्याची शक्यता असते.
३. लोणचे
लोणचे चुकूनही तांब्याच्या भांड्यात ठेऊ नये. लोणच्यात सिरकाचा प्रमाण असतो आणि हे तांब्याच्या भांड्यातील मेटल सोबत मिसळतो. म्हणून या भांड्यात ठेवलेला लोणचा आरोग्यास हानिकारक असतो.
४. साइट्रस फळ (आंबट फळ)
तांब्याच्या भांड्यात आंबट फळे ठेऊ नये आणि त्याचे सेवनही करू नये. यामुळे तुम्हचा पोट तर बिघडतोच त्याच सोबत उल्टी, चक्कर येण्यासारखे प्रकार होऊ शकतात.
५. लिंबूचा रस
लिंबूचा रस तांब्याच्या भांड्यात ठेवल्याने त्यातील ऍसिड तांब्याच्या भांड्यासोबत प्रक्रिया करतात. अशा लिंबाच्या रसाचा सेवन केल्यास पोट दुखणे आणि ऑसिडिटी सारखे प्रकार उदभवू शकतात.