पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – मूत्रविसर्जन ही आपल्या शरीरातले अशुद्ध पदार्थ शरीराबाहेर उत्सर्जित करण्याची एक नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीच्या मूत्रपिंडातून दर तासाला ७० ते ८० मिली एवढे मूत्र तयार होत असते. काहींना दिवसातून अनेकवेळा लघवीला जावे लागते. याची कारणे अनेक आहेत. पण प्रत्येक वेळेस लघवी भरपूर होते. तर इतरांना अगदी थोडी थोडी आणि सतत होत राहते. काही रुग्णांमध्ये दिवसा विशेष नाही. पण रात्री खूप वेळा लघवीला उठावे लागते.असे विविध त्रास अनेक आजारात होतात.
वारंवार लघवीला येण्याची कारणे
१) मूत्रात जर जंतुसंसर्ग झाला. तर जास्त वेळा येते. मूत्राशयाला सूज असल्यास, मूत्रपिंडे निकामी झाल्यावर लघवीचे प्रमाण वाढते.
२) मधुमेहात लघवीचे प्रमाण वाढलेले असते. किंबहुना रात्रीच्या वेळेस सतत लघवीसाठी उठणे हे मधुमेहाच्या प्राथमिक निदानाचे व्यवच्छेदक लक्षण मानले मानले जाते.
३) जास्त प्रमाणात पाणी, सरबत आणि इतर द्रव पदार्थ पिण्यात आले असल्यास जास्त लघवी होते. तसेच चहा, कॉफी, थंड पेये, मद्य जास्त प्रमाणात घेणार्या लोकांना जास्त प्रमाणात आणि वारंवार लघवीला होते.
४) खूप थंड हवामानात राहणार्यांना, सतत एसीमध्ये काम करणार्यांना हि वारंवार लघवीला जावे लागते.
वारंवार लघवीला येत असेल तर हे उपाय करा
१) आहारामध्ये जास्त तेलकट मसालेदार पदार्थ टाळावेत.
२) चहाकॉफी, मद्य यांसारखे उष्णपान टाळावे. धूम्रपान टाळावे. दिवसातून -१० ग्लास पाणी प्यावे.
३) पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही हि वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होऊ शकतो.
४) आहारामध्ये जास्त चोथायुक्त आहाराचा वापर करावा. मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी उपचार घ्यावा.