आरोग्यनामा ऑनलाईन – उन्हाळ्यात जास्त तापमान असल्याने पदार्थ लवकर खराब होतात. असे पदार्थ उन्हाळ्यात खाण्यात आल्यास वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागातो. उन्हाळ्यात विविध आजार बळावतात. उन्हाळ्यात खाण्या-पिण्याबाबत काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात ४ ते ५ तासांपूर्वी शिजवलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. सलाड आणि फळे कापल्यानंतर लगेच खावीत. शिळं अन्न किंवा फळे खाल्लीत तर त्यामुळे विविध प्रकारचे शारीरीक त्रास होऊ शकतात.
उन्हाळ्यातया उष्णतेमुळे फूड पॉयजनिंगची शक्यता जास्त असते. जास्त तापमानामुळे अन्नात बॅक्टेरिया अधिक होतात. हे बॅक्टेरिया ५ डिग्री सेल्सीअस ते ६० डिग्री सेल्सीअसच्या तापमानात वेगाने वाढतात. एक-दोन तासातच बॅक्टेरियाची संख्या २ ते ३ पटीने वाढते. यामुळे अन्न विषारी होऊन असे अन्न खाल्ल्यास फूड पॉयजनिंग होऊ शकते. तसेच पोटदूखी, उलटीचा त्रासही होऊ शकतो. उन्हाळ्यात लहान मुलांना डायरियाचा त्रास अधिक होतो. कारण त्यांचे पचनतंत्र हे कमजोर असते. त्यामुळे शिळे पदार्थ खाल्ल्याने मुलांवर लवकर वाईट परिणाम होतात. जूलाब, उलटी आणि ताप येणे यामुळे शरीरातील पाणीही कमी होऊन जास्त त्रास होऊ शकतो. दूध फ्रिजमध्ये ठेवून २ ते ३ दिवसांपर्यंत वापरू नये. दूध वेळीच संपविले पाहिजे. पॅqकगच्या दुध पिशवीवरील एक्सपायरी डेट तपासूण घ्यावी. रात्रीचे किंवा दिवसा शिल्लक राहिलेले अन्न फ्रिजमध्ये ठेवल्यास ते दुसऱ्या दिवशी नये. फ्रिजमध्ये ताजी फळे आणि भाज्या न कापता ठेवाव्यात.