आरोग्यानामा ऑनलाइन टीम : पचनसंस्थेतील गडबड किंवा दोष पोटाच्या विकारासाठी असतात. परंतु, या व्यतिरिक्तही पोटाच्या विकारांची कारणे आहेत. चिंता, दु:ख, मानसिक तणावामुळे ही पोटाचे विकार होतात. यास आयबीएस म्हणजे एरिटेबल बाऊल सिंड्रोम म्हटले जाते. जगातील किमान २० टक्के ज्येष्ठ नागरिकांना पोटाचे विकार आहेत. जगातील व देशातील ८० टक्के लोक अकारण चिंतेत असतात. तणावात राहतात, असे एका संशोधनातून समोर आले आहे.
संशोधक म्हणतात, आतड्याच्या कामकाजावर विपरीत परिणाम होतो. त्याची गती बदलते, त्यामुळे पोटाचे विकार सुरू होतात. तणाव, चिंता यामुळे आतडी संवेदनशील होतात.असामान्य अशा प्रतिक्रिया त्यातून मिळतात.अनेक वेळा हा रोग आनुवंशिक होतो.आई वडिलांकडून मुलांमध्येही जातो. पोटात जागा, गॅसमुळे पोट फुगणे, साफ न होणे, कायम उलटी आल्यासारखे वाटणे, छातीत जळजळ होणे, अशी लक्षणे आयबीएसच्या संक्रमणामुळे दिसू लागतात.
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हे प्रमाण दुपटी-तिपटीने अधिक असते. अशी लक्षणे दिसल्यास शिळे, मसालेदार, तिखट, तेलकट अन्न खावू नये. याशिवाय खूप गरम किंवा थंड अन्न खावू नये. प्रत्यक्षात आयबीएस हा रोग नसून रोगाचे लक्षण आहे. ही लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार उपचार करून घेतल्यास फरक पडू शकतो.