आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदलत्या काळाबरोबर आज व्यावसायिक व्यवस्थेमध्येही आमुलाग्र बदल झाले आहे. ग्रामिण भागात शिक्षणाची व नोकरीची सोय नसल्याने अनेक तरुणांना शिक्षण आणि नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडावे लागते. अशावेळी राहण्यात-खाण्यात त्यांच्या बदल होत असतात. अति तणाव आणि खाण्यापिण्याचे बदलेले चक्र यामुळे रक्तदाबाचा ताळमेळ बिघडत असून आणि कुटुंबापासून दूर राहण्यामुळे अनेक तरुण हायपरटेन्शचे शिकार होतात.
हायपरटेन्शन दोन प्रकारचे असते. एक इंसेंशियल जे वयासोबत होते. हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण हे हायपरटेन्शची शिकार झालेले असतात. मात्र, त्यांना हृदयविकाराचा त्रास का सुरु होतो ? याचे कारण समजत नाही. दुसरे सेकंड्री जे मुलांमध्ये कमी वयात किंवा वृद्धांमध्ये होते. मात्र, आता दुसऱ्या प्रकारामधील रुग्ण अधिक प्रमाणात येत आहे. त्यामुळे जर तुमचे वय ३० पेक्षा अधिक असेल तर नियमितपणे रक्तदाबाची तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच तुम्हाला किडनी आणि डोकेदुखीचा त्रास असेल तर काही महिन्यांनी नियमितपणे रक्तदाब तपासा, असा सल्ला डॉक्टर देतात.
असे समजले जाते की, आतापर्यंत ४५ वर्षांपलीकडे व्यक्तींना उच्चरक्तदाबाचा त्रासाला सामोरे जावे लागले. त्यातबरोबर ३० वर्षे वयोगटातील तरुणही या आजाराचे शिकार होत आहे. रक्तदाब १४०-९०, १३०-८० एमएमएचजी असेल तरही रुग्णाला हायपरटेन्शची शिकार मानले जाते. हायपरटेन्शची कोणतीही लक्ष दिसून येत नाही. जेव्हा असा रुग्ण तपासणीसाठी दवाखान्यात येतो तेव्हाच त्याला हायपरटेन्शनची बाधा झाल्याचे निदान होते.