आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दिवाळीत गोड आणि तळलेल्या फराळाची रेलचेल असते. दिवसभर जमेल तेव्हा फराळावर अनेकजण हात मारत असतात. लाडू, शंकरपाळे, चकल्या, करंज्या आदीं सतत खाल्ल्याने या काळात वजन हमखास वाढते. हे वजन कमी कसे करावे, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
१. वजन कमी करण्याचे नियोजन करा.
२. किमान ७ ते ८ तास झोप घ्या.
३. फराळ जास्त होत असेल तर जेवणाचे प्रमाण थोडे कमी करा.
४. दिवसभरात किती खाणार याचे प्रमाण ठरवून घ्या.
५. वजन कमी करण्यासाठी भरपूर चाला.
६. शुगर असणारी पेये किंवा कोल्ड्रिंक्स पिऊ नका. यामुळे अतिरिक्त कॅलरीज वाढतात.
७. सण आहे म्हणून व्यायाम बंद करू नका. नियमित व्यायाम करा.
८. एका दिवसात अनेक प्रकारचे व्यायाम करा, पाच मिनिट कार्डिओ ट्रेडमिल, बाइक केल्यानंतर लगेच डंबेल सर्किट, स्ट्रेचिंग आणि बेंच ओवर करा.
९. आहारात फळे आणि भाजीपाला घ्या. यामुळे कितीही खाल्ले तरी वजन वाढणार नाही.
१०. जिमला जायचे नसल्यास घरीच दोरी उड्या मारा. प्रथम ५० तर नंतर वाढवून १०० वेळा मारा.
११. व्यायाम करतेवेळी फक्त १० ते ३० सेकंदापर्यंतच आराम करा. यावेळी जास्त आराम नको.
१२. दोन किंवा तीन वेळेस जेवण करत असाल तर आठवड्यातून एक दिवस उपवास करा.
१३. प्रोटीन जास्त खाल्ल्याने मांसपेशी बनतात. यामुळे शरीरातील फॅट बर्न होते. शिवाय पोटदेखील भरलेले असते.
१४. दिवसभर भरपूर पाणी प्या. यामुळे जास्त भूक लागणार नाही आणि पोटदेखील भरलेले असेल.