आरोग्यनामा टीम – साधारपणे सर्वच लोक गरम पाण्यानं अंघोळ करतात. यावेळी केसांसाठीही ते गरमच पाणी वापरतात. परंतु खूप गरम पाणी केसांसाठी वापरलं तर याचे अनेक तोटे होतात. जाणून घेऊयात यामुळं काय नुकसान होतं.
1) केसांची मुळं कमोजर होतात – गरम पाण्यामुळं केसांची रोमछिद्रे मोकळी होतात. यामुळं केसांची मुळं कमजोर होतात. त्यामुळं जास्त गरम पाण्यानं अंघोळ केली तर केसगळतीची समस्या होऊ शकते.
2) केस जळण्याचा धोका – जास्त गरम पाणी असेल तर केस गळण्याचा धोका असतो. केस हे केरोटीन प्रोटीननं तयार झालेले असतात. म्हणून गरम पाण्याच्या संपर्कात येताच केस गळण्याचा धोका निर्माण होतो.
3) केसगळती – जर तुम्ही गरम पाणी वापरत असाल त्यातही शॅम्पू करत असाल तर केसगळती जास्त होते. गरम पाणी आणि शॅम्पू एकत्र आल्यानं असं होतं. त्यामुळं शॅम्पू करताना किंवा खास करून केसांसाठी जास्त गरम पाणी वापरू नका.
4) कंडिशनर आणि गरम पाणी – केसांना कंडीशनर लावल्यानंतर जर तुम्ही गरम पाण्यानं केस धुतले तर कंडीशनरचा प्रभाव नष्ट होतो. कंडीशनरचा सॉफ्टनेसही निघून जातो. त्यामुळं अशा वेळीही केसांसाठी गरम पाण्याचा वापर टाळावा.
5) केसांसोबत त्वचा आणि डोक्याचं नुकसान – गरम पाण्यानं अंघोळ केल्यानंतर केसांचं तर नुकसान होतंच सोबतच तुमच्या त्वचेचं आणि डोक्याचंही नुकसान होतं. यानं त्वचेवर लाल चट्टे आणि जळजळ होऊ शकते.