आरोग्यनामा ऑनलाइन टीम : अधुनिक युगात प्रत्येकाच्या कामाचे स्वरूप बदलले आहे. कामाचे स्वरूप बदललेले असतानाच प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. संधी कमी आणि स्पर्धा जास्त अशी स्थिती जवळपास सर्वच क्षेत्रात आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक श्रम अधिक झाल्यामुळे अनेकांची चिडचिड होते.
मात्र, अशा परिस्थितीत योगसाधना मनशांती लाभते. यासाठी सर्वांगासन सर्वात उपयोगी आहे. यामुळे शरीरातील काही सूक्ष्म ग्रंथी आणि मर्मस्थाने सक्रीय होतात. क्रोध वाढविणारा आवेश कमी होत जातो.सर्वांगासन करण्यासाठी सपाट जमीनीवर शवासनात काही क्षण झोपणे. सावकाशपणे दोन्ही पाय उचलून काटकोनात आणावेत.आता दोन्ही हातांचा आधार घेत खांद्यापासूनचा भाग वरच्या दिशेत स्थिर ठेवा.क्षमतेप्रमाणे या आसनात काही सेकंद स्थर थांबा. श्वास उच्छवास याकडे लक्ष ठेवा.
हळू हळू सराव वाढवा. पाठीच्या मणक्याचा त्रास, डोळ्यांचे विकार आणि उच्च रक्तदाब ज्यांना आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे आसन करावे. या आसनाच्या नियमीत सरावाने मानसिक ताण तणाव, निराशा, हताश, चिंता आदी व्याधी दूर होतात. डोळे तेजस्वी होतात. चेहरा तेजस्वी बनतो. स्त्रियांना विशेष लाभदायक मासीक पाळीसंबंधीच्या तक्रारी दूर होतात. रक्ताभिसरण उत्तम झाल्याने शरीर निरोगी राहते.मन शांत होते. स्वभावात सकारात्मक बदल दिसून येतात.