आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नारळाचे पाणी माणसाला अनेक भयंकर रोगांशी लढण्यासाठी ताकद देते. यातील तत्व शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करून शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. मलेरिया, डेंग्यू, चिकुणगुनिया आणि डायरियासारख्या आजारात शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण वेगाने कमी होते, अशावेळी नारळाचे पाणी प्यायल्यास फायदा होतो. नारळपाण्याचे पाच खास फायदे कोणते आहेत, ते जाणून घेवूयात.
हे आहेत ५ फायदे
१) उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यास नारळपाणी पिणे लाभदायक ठरू शकते. यातील व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाबाला नियंत्रित ठेवतात. यामुळे हाइपरटेंशनसुद्धा नियंत्रणात राहते.
२) नारळपाणी कोलेस्टेरॉल आणि फॅट फ्री असल्याने हृदयासाठी हे अतिशय चांगले आहे. तसचे अँटी-ऑक्सीडेंट गुण सुद्धा रक्ताभिसरणावर परिणामकारक आहे.
३) हँंगओव्हर दूर करण्यासाठी नारळपाणी पिणे हा एक चांगला उपाय आहे. एका नारळात सुमोर २०० मिलीलीटर अथवा त्यापैक्षा जास्त पाणी असते. तसेच यात कॅलरी सुद्धा खुपच कमी असतात.
४) जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असाल तर एकदा नारळपाणीसुद्धा वापरूप पहा.
५) अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने डोकेदुखीचा त्रास होतो. अशावेळी नारळपाणी प्यायल्यास डोकदुखी थांबते.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)