आरोग्यनामा ऑनलाईन टीम – महिलांनी विशीत असतानाच वजनावर नियंत्रण ठेवण्यास सुरूवात केली पाहिजे. कारण नंतर वजन नियंत्रणात ठेवणे त्यांच्यासाठी अवघड जाते. यामुळे भविष्यात लठ्ठपणाला सामोरे जावे लागते. तसेच विविध आजारही बळावू शकतात, असे ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलॅँड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना एका संशोधनात आढळून आले आहे. विविध आजारांना दूर ठेवायचे असल्यास वजन आटोक्यात ठेवणे, खुप गरजेचे आहे.
अशी घ्या काळजी
* वयाच्या विशीत असताना वजन फार वाढू देऊ नका.
* वयाच्या विशीत वजन दरवर्षी साधारण पाऊणेदोन किलो किंवा त्यापेक्षा थोडे अधिक वाढत असेल, तर वयाच्या चाळीशीपर्यंत लठ्ठपणा येऊ शकतो.
* यामुळे आरोग्याच्या समस्या वयाच्या चाळीशीत सतावू शकतात.
* वयाच्या विशीत असताना दीर्घ काळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत वजन वर्षाला पाऊणेदोन किलोपेक्षा जास्त वाढू देऊ नका.
हे आहेत धोके
१) वाढलेल्या वजनासोबत आरोग्य समस्यासुद्धा येतात.
२) लठ्ठपणा आणि डायबेटिस इतर आजारांना निमंत्रण देतात.
३) वाढत्या वजनामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो.
ही आहेत कारणे
* धुम्रपान करणे
* लग्नानंतर गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन
* वैवाहिक समस्या
* घटस्फोट
* जोडीदाराचा मृत्यू
* कौटुंबिक ताणतणाव
* रजोनिवृत्तीनंतरचा काळ
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)