आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही महिलांना रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्त्राव होत असतो. अशावेळी त्या दुर्लक्ष करतात. आजार अंगावर काढण्याची सवय महिलांना असते. परंतु , ही सवय घातक ठरू शकते. खूप त्रास झाला तरच महिला डॉक्टरांकडे जातात. तर काही महिला घरगुती उपाय करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात नेमके काय झाले आहे हेच त्यानां समजलेले नसते. त्यामुळे मोठ्या आजारांना तोंड द्यावे लागते. गर्भपिशवी काढावी की काढू नये? याबाबत महिलांमध्ये काही समज-गैरसमज आहेत. या गैरसमजातूनही आजाराकडे दुर्लक्ष केले जाते.
गर्भपिशवी काढण्याचा सल्ला अनेकदा डॉक्टर देतात. त्यावेळी महिलांना काय करावे सुचत नाही. कारण त्यांच्यामध्ये काही गैरसमज रूजलेले असतात. गर्भपिशवी काढावी लागते याची काही कारणे आहेत. ती कारणे आपणे जाणून घेवूयात. हार्मोन्सचे संतुलन बिघडले तर रक्तस्राव अनियिमत होतो. रक्तक्षय झाल्याने गर्भपिशवी काढावी लागते. तसेच गर्भपिशवीत गाठ झाली असेल तर ती गर्भासारखी वाढत जाते. यामुळे अधिक प्रमाणात रक्तस्राव होतो. महिलांनी वयाची ४० शी गाठली की मासिक पाळीत अनियमितता येते. हा काळ रजोनिवृत्तीचा असतो. काही महिलांना रक्तस्राव जास्त होतो. रजोनिवृत्ती आल्यानंतरही रक्तस्राव होणे, मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे, पोटात दुखणे, गाठ होणे, लघवी करताना त्रास होणे, लैंगिक संबंधाच्यावेळी त्रास होणे, असे त्रास होतात. यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. त्यामुळे गर्भपिशवी काढावी लागते.
महिलांच्या मासिक पाळीत अनियमितपणा येत असते. ही अनियमितता का येते याची काही कारणे आहेत. असंतुलित हार्मोन्स, कॅन्सर (गर्भपिशवीच्या आतील भागात किंवा गर्भपिशवीच्या मुखाचा), टयूमर या कारणांमुळे मासिक पाळीत अनियमितता येत असते. आता गर्भपिशवी काढण्याबाबत महिलांमध्ये असलेल्या गैरसमजाबाबत जाणून घेवूयात. हार्मोन्सचा असंतुलितपणा काही काळच असतो. तो नियमित होतो. मासिक पाळी गेली की सर्व नॉर्मल होते आणि रजोनिवृत्ती आली की सर्व साधारण स्थितीला येते यामुळे गर्भपिशवी काढायची गरज पडत नाही. गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. स्थूलता-अतिस्थूलता, वंधत्व, आनुवंशिक, हार्मोनल असंतुलन, उशिरा म्हणजेच वयाच्या ५५ वर्षांनंतर रजोनिवृत्ती आली तर गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गर्भपिशवी काढावी. अनियमित रक्तस्त्रात, यामुळे होणारा एनिमिया, कॅन्सरशी शक्यता यामुळे गर्भपिशवी काढावी लागते. रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्त्राव होत असल्यास काही प्रतिबंधात्मक उपाय करता येतात. यामध्ये औषध देऊन रक्तस्त्राव कमी करणे, क्युरेटिन करून अनियंत्रित रक्तस्त्राव कमी करणे तसेच गर्भपिशवी काढली तर होणारा त्रास कमी होतो.