आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गर्भपिशवीच्या समस्यांबाबत महिलांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. काही कारणांमुळे गर्भपिशवी काढण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अनेकदा रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्त्राव होत असेल तर पुढील धोके टाळण्यासाठी डॉक्टर ही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात.
ही आहेत कारणे
१) रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्त्राव व अन्य त्रास होत असल्यास गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी गर्भपिशवी काढावी लागते.
२) हार्मोन्सचे संतुलन बिघडले तर रक्तस्राव अनियिमत होतो. रक्तक्षय होतो म्हणून गर्भपीशवी काढावी लागते.
३) गर्भपिशवीत गाठ झाली असेल तर ती गर्भासारखी वाढत जाते. यामुळे रक्तस्राव अधिक प्रमाणात होतो.
लक्षणे
* अनियमित रक्तस्त्रात
* यामुळे होणारा एनिमिया
* कॅन्सरची शक्यता
प्रतिबंधात्मक उपाय
* क्युरेटिन करून अनियंत्रित रक्तस्त्राव कमी करणे.
* गर्भपिशवी काढली तर होणारा त्रास कमी होतो.
* औषध देऊन रक्तस्त्राव कमी करणे.