आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ज्यांना मधुमेह आहे, अशा लोकांना हिवाळ्यात जास्त भूक लागते. अशावेळी योग्य आहार घेणे गरजेचे असते. कारण चुकीच्या आहारामुळे रक्तातील सारखरेचे प्रमाण बिघडू शकते. हे प्रमाण नियंत्रणात ठेवणारे कोणते पदार्थ आहेत, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
मेथीदाणे
मधुमेहाच्या रूग्णांनी सकाळी कोमट पाण्यासोबत मेथीदाण्याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच मेथीची भाजी सुद्धा मधुमेहाच्या रूग्णांसाठी लाभदायक आहे.
काळी मिरी, आले
मधुमेहाच्या रूग्णांनी थंडीत काळी मिरी आणि आल्याचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
दालचिनी
हिवाळ्यात दालचिनीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. दालचिनीचे जास्त सेवन केल्याने जास्त भूक लागत नाही. दालचिनी भाज्यांव्यतिरिक्त चहासोबतही सेवन करू शकता.
अंजीर
अंजीरचे सेवन केल्याने इन्सुलिन तयार होण्यास मदत होते. यासाठी मधुमेहाच्या रूग्णांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.