आरोग्यानामा ऑनलाईन टीम : पाणी किती प्यावे, याचे जसे प्रमाण, नियम आहेत, तसेच पाणी कसे प्यावे याचीही योग्य पद्धत आहे. चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. पाणी नेहमी हळूहळू प्यावे, यास वॉटर थेरपी म्हणतात. उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी अन्ननलिकेद्वाके वेगाने खाली वाहून जाते. यामुळे पचनतंत्र बिघडते. हृदयालासुद्धा नुकसान होऊ शकते.
होऊ शकतात हे त्रास
१ पाणी किडनीमधून योग्य रितीने फिल्डर न होता वाहून जाते.
२ मूत्राशय, हृदय आणि किडनीचे विकार होऊ शकतात.
३ संधिवातासारखे भयंकर आजार जडू शकतात.
४ शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन बिघडते.
५ सांधेदुखी आणि गाठ येण्यासारख्या समस्या होतात.
६ लवकर तहान भागत नाही.
७ अपचन यांसारख्या समस्या वाढतात.
हे लक्षात ठेवा
* बसून पाणी प्यायल्याने पोटाला आराम मिळतो. पोटाचे सुधारते.
* थंड पाणी कधीही पिऊ नये.
* कमी तापमान असलेले पाणी प्यायल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होतात.
* बाहेरुन प्रवास करुन आल्यानंतर लगेचच उभे पाणी पिऊ नये.
Visit : arogyanama.com