आरोग्यानामा ऑनलाईन टीम : अगदी प्रत्यक्षात एखाद्याने हा अनुभव घेतला नसेल तरी चित्रपटात मधुचंद्राच्या रात्री नववधू वराला दुधाचा ग्लास देतानाचे दृश्य सर्वांनी नक्कीच पाहिले असेल. मधुचंद्राला पत्नीने पतीला ग्लासभर दुध पाजणे ही प्रथा खुप जुनी आहे. अशा जुन्हा प्रथा, परंपरांमागे काही चांगली कारणे असतात. मधुचंद्राच्या रात्री दुध पिण्यामागे नेमके कोणते कारण असते, ते आपण जाणून घेणार आहोत.
ही आहेत कारणे
१ दुधातील घटक शारिरीक थकवा दूर करुन कामभावना उत्तेजित करतात. योग्य प्रमाणात दूध प्यायल्यास कामोत्तेजना वाढते. शारिरीक संबंध प्रस्थापित करताना स्टॅमिना मिळतो. थकव्याचा परिणाम न होता मधुचंद्राचा अनुभव सुखद होतो.
२ लग्न सोहळा २ ते ३ दिवसांचा असल्याने दोघेही खुप थकलेले असतात. त्यांच्या शरिराची झीज भरून निघावी म्हणून दोघांनाही दुध दिले जाते. यासाठी त्यात सुका मेवा किंवा केसर टाकले जाते.
३ दुध पवित्र आणि सात्विक आहे. यामुळे नवविवाहीत जोडप्याला नव्या आयुष्याची चांगली सुरुवात करण्यासाठी दुध दिले जाते.
Visit : arogyanama.com