आरोग्यनामा ऑनलाइन टीम – निरोगी आयुष्याच्या दृष्टीने योग्य वेळेत योग्य तो आहार घेणे महत्वाचे असते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी तर जेवणाची वेळ पाळणे महत्वाचे असते. तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास दुपारचे जेवण योग्य वेळेत करणे अधिक महत्वाचे असते. कामाच्या गडबडीत किंवा ऑफिसमध्ये काही करणांवरून दुपारचे जेवण करण्यासाठी उशीर झाला तर हीच सवय वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते असे तज्ञांचे मत आहे.
‘या’ वेळेत दुपारचे जेवण करू नकाच
अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, दुपारचं जेवण ३ वाजल्यानंतर जेवणाऱ्या लोकांमध्ये वजन कमी होण्याची प्रक्रिया कमी होते. हे संशोधन स्पेनमधील जवळपास १२०० पेक्षा जास्त अधिक वजन असणाऱ्या लोकांवर करण्यात आलं आहे. संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्ती वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत होत्या. संशोधनादरम्यान असं आढळून आलं की, जे लोक ३ वाजल्यानंतर दुपारचं जेवण करतात. त्यांच वजन लगेच कमी होत नाही तर वाढतं.
या संशोधनातून खासकरून विशेष जेनेटिक असणाऱ्या लोकांना सहभागी करण्यात आले होते. तसेच २००३ मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनाच्या अहवालामध्ये ही गोष्ट समोर आली होती की, दुपारी ३ वाजल्यानंतर जेवण करणाऱ्या लोकांचं वजन लगेच कमी होत नाही.
वेळेत जेवण करणे महत्वाचे
जी व्यक्ती योग्य वेळेत जेवण करीत नाही त्या व्यक्तीला आरोग्याच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हावर्ड विद्यापीठातर्फे करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार आयोग्यवेळी आहार घेतल्यामुळे त्यांना वजन कमी करताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. दररोज एका ठराविक वेळी जेवण घेतल्यामुळे शरीराची शरीराची सर्केडिअन क्लॉक योग्य पद्धतीने काम करते. या संशोधनानुसार सांगण्यात येते की, योग्य वेळी जेवल्याने मेटाबॉलिज्म, लठ्ठपणा आणि स्लिप सायकल योग्य पद्धतीने काम करते. तुम्हीही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर योग्य वेळी सुरुवात करा.