पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – आपण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खुप कमी जेवण करतो. परंतु, तरीही आपलं वजन वाढत.त्यामुळे नेमकं काय होतय ते कळतच नाही. पण काही वेळा आपण आहार तर योग्य घेतो. पण तो खात व्यवस्थित नाही. त्यामुळे आपलं वजन वाढत. वजन नियंत्रनात ठेवण्यासाठी आपण जो आहार घेतो. तो योग्य पद्धतीने घेणे गरजेचे आहे. तसाच बटाटा जर तुम्ही योग्य पद्धतीने खाल्ला तर तुमचं वजन नियंत्रणात राहू शकत.
काही लोकांना बटाटा खूप आवडतो. पण त्यांना असं वाटत कि, बटाटा खाल्याने वजन खूप वाढत म्हणून ते बटाटा खात नाहीत.परंतु आपण जर बटाटा योग्य पद्धतीने खाल्ला तर आपलं वजन वाढत नाही. उलट जी लोक आठवड्यातून ५ वेळा बटाट्याची हेल्दी भाजी किंवा दुसरे पदार्थ खातात त्यांचं वजन कमी झाल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे.
तुम्ही बटाट्याचे चिप्स फ्रेंच फ्राईज जास्त खाऊ नका.आणि जास्त बटाटा खाल्ला तर वजन वाढते. परंतु थोडाच खाल्ला तर खूप वेळ भूक लागत नाही. आणि त्यातून फायबर मिळते त्यामुळं आपलं वजन वाढत नाही. तुम्ही जर बटाटा तळण्यापेक्षा शिजवून खाल्ला तर तुमचं वजन अगदी नियंत्रणात राहील. तुम्ही जर काही काम करण्याच्या आगोदर बटाटा खाल्ला तर तो काम करण्यासाठी इंधनासारखं काम करतो. आणि बटाट्यामध्ये असणारे फायबर ब्लड आणि शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते.