आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरासाठी, शरीराच्या वाढीसाठी आणि जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. नियमित योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीर निरोगी राहू शकते. पाण्याचे असंख्य फायदे असून पाण्याशिवाय शरीर कामच करू शकत नाही. म्हणूनच पौष्टिक पदार्थांपेक्षाही पाण्याचे महत्व जास्त आहे. एवढेच नव्हे तर पाण्याची सर कशालाही येऊ शकत नाही. पाण्यामुळे कोणते फायदे होतात, हे आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत फायदे
१) शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी उपयुक्त आहे. घाम आणि लघवीवाटे हे विषारी घटक बाहेर पडतात.
२) पाण्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
३) त्वचेलाही पाण्याची गरज असते. पाण्यामुळे त्वचा नितळ राहते.
४) मद्यप्राशनामुळे येणारा हॅँगओव्हर उतरण्यासाठीही पाण्याचा उपयोग होतो.
५) श्वासाची दुर्गंधी घालवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.
६) पाण्यामुळे थकवा दूर होतो. म्हणूनच थकलेला व्यक्ती प्रथम पाणी पितो आणि ताजेतवाने वाटते.
७) पाण्यामुळे मूडही चांगला राहातो. मूड स्विंग होत नाही.
८) डोकेदुखी आणि अर्धशिशीसारख्या प्रकारावर पाण्याचा चांगला उपयोग होतो.
९) अपचन होणे, बद्धकोष्ठता यासारख्या विकारांवरही पाणी उत्तम विरेचक आहे.
१०) वजन कमी करण्यासाठी पाणी नैसर्गिक उपाय आहे.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)