आरोग्यानामा ऑनलाईन टीम : स्मरणशक्ती कमी झाल्यास आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी स्मरणशक्ती चांगली असणे अतिशय गरजेचे असते. स्मरणशक्ती कमी होण्याची विविध कारणे आहेत. पौष्टिक पदार्थांचा अभाव, वाढते वय या कारणांमुळेही स्मरणशक्ती कमी होते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय असून ते जाणून घेवूयात.
हे आहेत उपाय
१ पुरेशी झोप घ्या. चांगल्या झोपेमुळे स्मरणशक्ती कायम ठेवण्याच्या क्षमतेची वाढ होते.
२ नियमित बदाम सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते. यातील प्रोटीन, मॅगनीज, कॉपर आणि रायबोफ्लाविनमुळे अल्झायमरसारखे आजार दूर राहतात. रोज रात्री ५ बदाम भिजवा. सकाळी उठल्यावर ते खा.
३ फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यास मेंदूच्या रक्त नलिका मजबूत आणि लवचिक होतात. डोक्याला फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन मिळाल्याने स्मरणशक्ती वाढते. वांगी खाल्ल्यानेही फायदा होतो.
४ नियमित ध्यान, प्राणायाम आणि व्यायाम केल्याने तणाव दूर होतो. आत्मविश्वास वाढतो. एकाग्रता वाढते आणि मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन, रक्त आणि पोषक तत्व मिळतात. यामुळे स्मरणशक्ती वाढते.
Visit : arogyanama.com