आरोग्यनामा ऑनलाईन टीम –
१) ‘जीवनसत्त्व अ’ च्या कमतरतेमुळे ‘रातांधळेपणा’ हा आजार होतो.
जीवनसत्त्व अ ची कमतरता दूर करण्यासाठी भोपळा, गाजर, पिकलेला आंबा, हिरव्या भाज्या , हरभरा, दूध , मका, मोड आलेले कडधान्य या गोष्टींचे सेवन करावे.
२) ‘बेराबेरी’ हा आजार ‘जीवनसत्त्व ब’च्या कमतरतेमुळे होतो.
जीवनसत्त्व ब ची कमतरता दूर करण्यासाठी हिरव्या भाज्या, बटाटा, सफरचंद, चिकू इ. फळे, डाळी , हातसडीच्या तांदूळाच्या वरील भागावर जीवनसत्त्व ब जास्त असते.
३) ‘जीवनसत्त्व क’ च्या कमतरतेमुळे ‘स्कर्व्ही’ हा रोग होतो.
जीवनसत्त्व क ची कमतरता दूर करण्यासाठी आंबट फळे, लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, पेरू, चिंच, मोड आलेले धान्य आंबवलेले पदार्थ, ढोकळा, इडली इ. मध्ये जीवनसत्त्व क जास्त असते.
४) मुडदूस हा ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो. कोवळ्या उन्हात ‘ड’ जीवनसत्त्व जास्त प्रमाणत मिळते. तेलयुक्त आहार घेतल्यास ‘ड’ जीवनसत्त्व मिळू शकते.