आरोग्यानामा ऑनलाईन टीम : जास्त वेळ फॉईल पेपरमध्ये पदार्थ ठेवले तर ते खराब होतात. त्यातील पोषकतत्वही नष्ट होतात. यात पदार्थ गरम करणे शरीरासाठी अत्यंत घातक असते. मसालेदार पदार्थांवर याचा जास्त परिणाम होतो. यातील रासायनिक घटक पदार्थामध्ये मिसळतात. हे पदार्थ खाल्याने रासायनिक घटक शरीरामध्ये प्रवेश करतात. यामुळे होणारे दुष्परिणाम जाणून घेवूयात.
हे आहेत दुष्परिणाम
१ अॅल्युमिनिअममुळे मेंदूच्या विकासाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.
२ हाडांसंबंधीत आजार आधीपासूनच असतील त्यांच्यासाठी हे अत्यंत घातक ठरतं.
३ शरीरात अॅल्युमिनिअमची मात्रा अधिक झाली तर त्याचा गंभीर परिणाम मेंदूवर होतो.
४ मेंदूमधील पेशींची वाढ खुंटते. विसर पडणे, विचार करण्याची शक्ती कमजोर होते.
५ हाडे कमजोर होतात.
६ रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.
७ अल्जायमर सारखे आजार होऊ शकतात.
Visit : arogyanama.com