आरोग्यनामा ऑनलाईन टीम – झोप ही आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे. अपूर्ण, अशांत झोपेमुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. यामुळे अनेक आजार होण्याचाही धोका असतो. यासाठी पूर्ण आणि शांत झोप खुप आवश्यक आहे. किमान 7 ते 8 तास घ्यावी असे तज्ज्ञ सांगतात. ज्यांना अंथरुणात पडल्यावर लगेच झोप लागत नाही, शांत आणि गाढ झोप लागत नाही त्यांनी 1, 2, 3, चा मंत्र जपावा. याविषयी माहिती घेवूयात.
हा मंत्र लक्षात ठेवा
* झोपायच्या 1 तास आधी कोणत्याही कृत्रिम प्रकाशाला डोळे भिडवायचे नाहीत. म्हणजेच कोणत्याही स्क्रीनपासून दूर राहावे.
* झोपण्याच्या 2 तास आधी जेवण करावे.
* झोपायच्या वेळेच्या 3 तास आधी थोडा व्यायाम करा, किंवा गरम पाण्याने आंघोळ करा. यामुळे स्नायूंमध्ये रक्ताभिसरण वाढते.
सुमारे 21 दिवस या मंत्राचे पालन करा. यामुळे वरील गोष्टींची सवयच तुम्हाला लागून जाईल. शिवाय गाढ आणि शांत झोप लागेल.