आरोग्यानामा ऑनलाइन टीम : मधुमेहाचे प्रमाण भारतात मोठ्याप्रमाणात वाढत असून सध्या देशात लाखो लोकांना मधुमेहाने जखडले आहे. हा आजार होण्याची विविध कारणे असून यापैकी बदललेली जीवनशैली हे प्रमुख कारण आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काही रूग्णांना नियमित इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. परंतु, हे इंजेक्शन योग्यप्रकारे घेतले नाही तर मधुमेह नियंत्रणात राहू शकत नाही.
हे लक्षात ठेवा
इन्सुलिनचे इंजेक्शन्स घेण्याची जागा योग्य असावी. इंजेक्शन घेण्याची जागा रोटेशपद्धतीने बदलत रहा. इंजेक्शनची सुई सुद्धा सतत बदला.
प्रथम डॉक्टरांकडून प्रशिक्षण घ्या.
इन्सुलिन थेरपीवर असलेले बहुतांश लोक चुकीची पद्धतीने इंजेक्शन घेतात.
योग्य ठिकाणी इन्सुलिनचे इंजेक्शन्स घ्या. मांडीवर, दंडावर, पोटावर ही इंजेक्शन घेतली जातात. चुकीच्या जागी हे घेतल्यास मधुमेह वाढण्याचीही शक्यता असते.
सुमोर ७५ टक्के लोकांची इन्सुलिन घेण्याची पद्धत चुकीची असल्याने त्यांना दुष्परिणाम भोगावे लागतात.
Visit : arogyanama.com