आरोग्यानामा ऑनलाईन टीम – पावसाळा आणि हिवाळ्यात वातावरणात बदल झाल्याने व्यायाम आणि आहारात अचानक बदल होतो. या बदलामुळे लठ्ठपणा वाढण्याची भिती जास्त असते. कारण वातावरण बदलाचा परिणाम शरीरावर होत असतो. यासाठी आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात व्यायामाचे प्रमाण कमी होते, मात्र आहार तोच राहतो. यासाठी आहारात थोडा आणि योग्य बदल केला पाहिजे.
हे बदल करा
१ पावसाळा आणि हिवाळ्यात अनेक जण व्यायाम कमी करतात. पण डाएटमध्ये तेच पदार्थ खात असल्याने शरीरात अतिरिक्त फॅट जमा होण्याची भिती असते.
२ या दिवसांमध्ये शरीर गरम राहण्यासाठी अतिरिक्त उर्जेची आवश्यकता असते. यामुळे जास्त भुख लागते.
३ वातावरणात बदल झाल्यानंतर सॅड म्हणजेच सीजनल अफेक्टिव डिसऑर्डरपासून रक्षण करण्यासाठी अनेक जण ओव्हरडाटिंग करत असतात.
हे खावे
भाज्या
गाजर, शलज हे पौष्टिक असते. याचे सेवन करावे. यामुळे सर्दी-खोकला आणि ताप हे आजार होण्यापासून रक्षण होते.
ग्रीन टी
एंटी-ऑक्सीडेंट्स भरपूर असलेल्या ग्रीन टीचे सेवन केल्यास बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून रक्षण होते. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
लसून
लसून खाल्ल्याने शरीर गरम राहते. लसणामुळे अनेक आजारांपासून रक्षण होते.
मध
मधाच्या सेवनामुळे देखील शरीरात गरमी राहते. सकाळी दूधामध्ये साखर टाकण्याऐवजी मध टाकून पिल्यास फायदा होतो.
हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि क असते. हे जीवनसत्व शरीराला महत्त्वाचे असते.
फळे
संत्रे, द्राक्षे या फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे त्वचा निरोगी राहते. याच्या सेवनामुळे मेटाबॉलिज्म उत्तम होते. तसेच कॉलेस्टेरॉल कमी होते.
हे पदार्थ टाळावे
कार्बोहायडरेट्स
या काळात तांदूळ, ब्रेड खाणे आरोग्यासाठी चांगले असते. परंतु या पदार्थांच्या अति सेवनामुळे नुकसान होण्याची भिती असते.
गोड
अशा हावामानात गोड पदार्थ खाणे योग्य असते असे मानण्यात येते. पण याच्या अतिसेवनामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. या दिवसांमध्ये केक, कुकीज यासारखे पदार्थ खाणे टाळावे.
डेअरी प्रोडक्ट्स
या दिवसांमध्ये दूध आणि दूधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ जसे चीज, पनीर आणि तुप याच्या सेवनामुळे घसा, नाक आणि छातीमध्ये कफ होण्याची भिती असते.