आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या शरीरातवर मोठ्याप्रमाणात दिसून येत असतो. आज अनेक लोक विविध आजारांनी ग्रस्त आहेत. हृदयरोग, मुधमेह, लठ्ठपणा, रक्दाब असे आजार घरोघरी आढळतात. हे आजार केवळ जीवनशैलीचे परिणाम आहेत. चूकीच्या आहार पद्धतीमुळे शरीराचे नुकसान होत आहे. अशा आहाराचा सर्वाधिक गंभीर परिणाम हा हृदयावर होत असतो. चूकीच्या आहारामुळे हृदयाचे नुकसान होऊ शकते. हृदय निरोगी राहण्यासाठी जेवढा व्यायाम महत्वाचा आहे, तेवढाच योग्य आहार महत्वाचा आहे.
अशी घ्या काळजी
* जेवणात मिठाचा अधिक वापर केल्याने रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे दररोज सहा ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचा वापर जेवणामध्ये करू नका.
* जेवणात अधिक कॅलरीचा समावेश केल्याने वजन वाढते. यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त मेहनत करावी लागते. अशावेळी ओट्स, फळे, भाज्या, सर्वप्रकारच्या शेंगा, घेवडा आणि वाटाण्याचे भरपूर सेवन करा.
* धूम्रपानासारख्या वाईट सवयीपासून दूर राहा. यामुळे हृदय आणि श्वसन प्रणालीवर पडणाऱ्या दुष्परिणामांपासून बचाव करता येईल. ज्या लोकांना एकदा हृदयविकाराचा झटका आला आहे, ते लोक अशा प्रकारे दुसरा झटका येण्यापासून वाचू शकतात.
* वजन कमी करण्यासाठी कदापिही डायटिंग करू नका. यामुळे इतर समस्या म्हणजे थकवा, अशक्तपणा येतो आणि पोषक द्रव्यांची पूर्तता होत नाही. ही स्थितीसुद्धा हृदयासाठी धोका निर्माण करू शकते.
* नियमितपणे ३० मिनिटे वॉकिंग किंवा जॉगिंग करा. यामुळे कॉलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी होईल.