आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चुकीची आहारपद्धती , प्रदूषण आणि मिठाचे सेवन हळूहळू रक्त दुषित करते. रक्ताचे शुद्धीकरण आणि अवयवांची कार्यप्रणाली चांगली ठेवण्यासाठी काही औषधी वनस्पती आहेत. ज्यामुळे नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध राहण्यास मदत होते. रक्त शुद्ध ठेवणाऱ्या अशाच काही वनस्पतीं बद्दल जाणून घेऊयात
आवळा
आवळ्याच्या गुणधर्मामुळे रक्तामध्ये वाढलेली उष्णता कमी होते, रक्तातील अशुद्ध घटकद्रव्ये दूर होऊन रक्त शुद्ध होते. तसेच आवळ्यामध्ये विटामिन सी असल्याने नवीन रक्त तयार करण्यासही ते फायद्याचे ठरते. आवळ्यामुळे शरीरातील आयर्नचं प्रमाण वाढतं. शरीरातील ऑक्सिजनही पातळी वाढते. रक्तात योग्य प्रमाणात ऑक्सिजन असल्यास रक्त शुद्ध राहण्यास मदत होते.
लिंबू
एका लिंबाचे चार भाग करा आणि चार कप दूध घेऊन त्या प्रत्येक कपामध्ये १० मिनिटांच्या अंतराने एकेक तुकडा पिळा आणि लगेच प्या. प्रत्येक १० मिनिटानंतर एक कप प्यावे, असे ५ आठवडे करा.
आहारामध्ये लिंबाचा नेहमी समावेश कराल तर तुमचे रक्त शुद्ध होईल. यासाठी गरम पाण्यामधून लिंबाचा रस दिवसातून तीनवेळा घेतला पाहिजे.
कडुलिंब
कडुलिंबामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसला दूर ठेवण्याची क्षमता असते. तसेच रक्त शुद्धीसाठीही कडुलिंब मदत करते.
गूळवेल
रक्तातील विषारी द्रव्यं काढून टाकण्यासाठी गुळवेल खूप महत्वाची आहे. यामुळे रक्तातील अशुद्ध घटकद्रव्ये दूर होऊन ते शुद्ध होते.
मंजिष्ठा
मंजिष्ठामुळे फक्त रक्तच शुद्ध होत नाही, तर रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
कारले –
कारल्याचा ५० ग्रॅम रस एक कप पाण्यात एकत्र करून रोज नियमित काही दिवस सेवन केले तर रक्त शुद्धीकरण होईल.