आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आंघोळ करताना शॉवरखाली जास्त वेळ बसल्यास विविध प्रकारच्या समस्या होऊ शकतात. तीस मिनिटाहून अधिक काळ शॉवरखाली राहील्यास त्वचेचा ओलावा नष्ट होतो. यासाठी शॉवरखाली जास्तीत जास्त दहा मिनिटेच अंघोळ करावी.
कधीही करू नका या चुका
१ आंघोळीसाठी जास्त गरम पाणी घेतल्यास त्वचा कोरडी होते. यामुळे शरीराला खाज सुटण्याची शक्यता असते. शरिरातील आवश्यक ऑईल नष्ट होते.
२ आंघोळीसाठी सुगंधी साबण वापरल्याने त्वचा कोरडी होते. यासाठी एशेंशियल ऑईल युक्त साबण वापरावा.
३ आंघोळीसाठी ब्रश वापरत असल्यास जुना ब्रश वापरू नका. जुन्या ब्रशमुळे त्वचेला इजा होऊ शकते. जुने बॉडी पफ किंवा ब्रशमुळे शरिरावर किटाणू जमण्याची शक्यता असते.
४ आंघोळ झाल्यानंतर टॉवेलने जास्त जोरात अंग घासून पुसू नये. यामुळे त्वचेला इजा होऊ शकते. यासाठी मऊ टॉवेल वापरावा.
Visit : arogyanama.com