आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्यावर जर अन्याय झाला किंवा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही. तर आपल्याला खूप राग येतो. जास्त राग आल्यामुळे आपण कोणतेही चुकीचे पाऊल उचलतो. किंवा कोणावरही आपला राग व्यक्त करतो. आणि नंतर आपल्याला आपल्या या वागण्याचं वाईट वाटत. त्यामुळे जास्त राग आल्यावर आपल्या रागावर कसं नियंत्रण करायचं हे जाणून घेऊया.
१) व्यवस्थित झोप :
तुमची जर ७-८ तास झोप झाली तर तुमची जास्त चिडचिड होत नाही. आणि कमी झोप हे राग येण्याचे कारण ठरते. त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा जास्त राग येत असेल तर तुम्ही रोज चांगली झोप घ्या. यामुळे तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण मिळवता येईल.
२) व्यायाम करा :
व्यायाम केल्याने आपले मन शांत राहते. मन शांत असल्यावर आपण आपल्या रागाला नियंत्रणात आणू शकतो. त्यामुळे रागावर जर नियंत्रण मिळवायचे असेल तर नियमित व्यायाम करा.
३) मन नियंत्रणातं ठेवा :
आपण आपले मन नियंत्रणात ठेवले तर कोणतीही समस्या निर्माण होत नाही. त्यामुळे तुम्ही अगोदर मन नियंत्रणात ठेवा. यासाठी तुम्ही रोज प्राणायम करा. यामुळे तुमचे मन शांत राहील. आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमच्या रागावर नियंत्रण ठेऊ शकता.
४) दीर्घ श्वास घ्या :
तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जास्त राग आला तर तुम्ही दीर्घ श्वास घ्या. कारण यामुळे तणाव कमी होतो. आणि तुमचे मन शांत होते. त्यामुळे तुमच्या रागासाठी दीर्घ श्वास घेणे हा चांगला उपाय आहे.
५) थंड पाणी प्यावे :
जास्त राग आला असेल तर थंड पाणी प्यावे. आणि बाराखडीची उलट गणना सुरु करावी. यामुळे तुमचा राग नियंत्रणात येण्यास मदत होईल.