आरोग्यनामा ऑनलाइन टीम – घाम येणे अनेकांना त्रासदायक आणि नकोसे वाटते. यासाठी विविध उपाय सुद्धा काही जण करतात. घाम येणे ही शारीराने केलेली आवश्यक प्रक्रिया आहे. घामासोबतच शरीरातील अशुद्ध घटक त्वचेच्या रोमछिद्रांमधून टाकले जातात. यामुळे त्वचेला आणि शरीराला फायदा होतो. मात्र, घाम येत नसेल त अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या कोणत्या ते जाणून घेवूयात.
होऊ शकतात या समस्या
१. शरीरात मीठ आणि कॅल्शिअमचे प्रामाण वाढते.किडनी स्टोनचा धोकाही संभवतो.
२. जखमा भरून येण्यासही वेळ लागतो.
३. शरीराचे तापमान कमी होत नाही.
४. रोगप्रतिकारक शक्ती कमी असते.
५. त्वचेचे विकार होण्याची शक्याता असते.