आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आदिवासी बांधव दुर्गम जंगल भागात वास्तव्य करत असल्याने त्यांना वनौषधींची चांगली जाण असते. विविध रोगांवर हे आदीवासी बांधव वनौषधींचा वापर करतात. अनेक आजार ते याच वनस्पतींच्या बळावर बरे करतात. वनस्पती, झाडे यांच्याशी त्यांचे जवळचे नाते असते. परंतु, आपण नियमित आहारात जी पालेभाजी खातो, तीच पालेभाजी आदिवासी बांधव भयंकर रोगांवर औषध म्हणून वापरतात. गुजरातमधील काही आदिवासी हे पालकच्या भाजीचा वापर थॉयराईड, रक्तदाब, हृदयविकार, किडनी स्टोन आदी आजारावर करतात.
पालकच्या भाजीत अनेक औषधी गुणधर्म असतात. पालकचे शास्त्रीय नाव स्पिनॅसिया ओलेरोसिया आहे. पालकाच्या भाजीत जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन व लोह असते. पालकमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन निर्माण करणारे अॅमिनो अॅसिड असते. पालकाच्या पानांचा रस आणि नारळ पाणी एकसमान मात्रामध्ये मिसळून पिल्यास मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन लघविद्वारे शरीराबाहेर निघून जातो. कावीळ झालेल्या व्यक्तीला पालकाचा रस कच्च्या पपईमध्ये मिसळून खायला दिल्यास कावीळ बरी होते. गुजरातमधील आदिवासी लोक कावीळ झालेल्या व्यक्तीला मुगाच्या डाळीमध्ये पालक टाकून तयार केलेली भाजी खाऊ घालतात.
अॅनिमिया किंवा रक्त अल्पतेचा आजार असल्यास दररोज एक ग्लास पालकाचा रस दिवसातून तीन वेळेस घ्यावा. हृदयविकार असलेल्यांनी दररोज एक कप पालकाच्या रसामध्ये २ चमचे मध टाकून या रसाचे सेवन करावे. हृदयविकारावर हे खूप रामबाण औषध आहे. तसेच पालकाच्या एक ग्लास रसामध्ये चवीनुसार काळे मीठ टाकून सेवन केल्यास दमा आणि श्वसनाच्या रोगामध्ये आराम मिळतो. रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर असल्यास पालकाच्या भाजीचे नियमित सेवन करावे. तसेच काकडी, पालक आणि गाजराचे एकसमान मात्रामध्ये ज्यूस तयार करून पिल्यास केस वाढण्यास मदत होते. थायरॉइडचा त्रास असल्यास एक ग्लास पालकाच्या रसामध्ये एक चमचा मध आणि एक चतुर्थांश जिऱ्याची पूड टाकून या रसाचे सेवन करावे.