आरोग्यनामा ऑनलाइन टीम – निरोगी आयुष्यासाठी फळांसारखा दुसरा आहार नाही. यासाठी नियमित फळे सेवन करण्याचा सल्ला आहरतज्ज्ञ देतात. परंतु, कोणती फळे कोणत्या आजारावर गुणकारी आहेत, हे जसे महत्वाचे आहे, तसेच कोणती फळे कोणत्या वेळी खावीत हे सुद्धा महत्वाचे आहे. काही फळे सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास त्याचा खुप चांगला परिणाम आरोग्यावर होतो. अम्लीय फळांचे सेवन सकाळी उपाशीपोटी केल्यास ती शरीरात क्षारीय होतात. यामुळे हृदय आणि पचनाशी संबंधित अनेक आजारदेखील दूर होतात.
ही फळे सेवन करा
संत्री
संत्रा अम्लीय फळ असून ते शरीरात जाऊन क्षारीय होते. सकाळी उपाशीपोटी आणि दिवसातून चार संत्र्यांचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल कमी होते. मूत्रपिंड आणि मुतखड्याची समस्याही दूर होते.
पपई
यात कॅरोटिन भरपूर असल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. उपाशीपोटी पपईचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. पोटाशी संबंधित रोग दूर होतात.
सफरचंद
यातील अँटीऑक्सिडंट्स घटकांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. उपाशीपोटी दररोज एक सफरचंद खाल्ल्याने कँसरचा धोकाही कमी होतो.
किवी
किवी हे व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्निशियम, फायबर आणि व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. उपाशीपोटी हे खाल्ल्यास अधिक फायदा मिळतो.