आरोग्यानामा ऑनलाइन टीम – मनुष्याला स्वस्थ आणि निरोगी शरीर पाहिजे असेल तर त्याने पौष्टिक आहार घ्यावा. संतुलित आहार घेतल्याने आजार दूर राहतात. परंतु कोणता आहार जास्त फायदेशीर आहे हे यासाठी माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी अशा पाच गोष्टी आहेत ज्यांचा जेवणात समावेश केल्यास शरीर निरोगी आणि स्वस्थ राहू शकते. या गोष्टी कोणत्या आहेत, त्याची माहिती घेवूयात.
शरीरात तयार होणाऱ्या विषारी कणांना रोखण्यात पत्ताकोबी विशेष कार्य करते. पत्ताकोबीत इतर भाज्यांच्या तुलनेत जास्त पौष्टिकता असल्याने पत्ताकोबीचा आहारात नियमित समावेश केला पाहिजे.
तसेच जेवणात पालक व इतर पालेभाज्यांचा समावेश केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. पालकात भरपूर फोलेट असते. तसेच यामुळे डीएनए आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होत नाही. त्वचा रोग आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या आजारांवरही पालक उपयोगी आहे. हृदयरोग दूर ठेवण्यासाठी, वारंवार कफ होत असेल तर पेरूचा वापर जेवणात करावा. ज्यांना मधुमेह आहे त्यांनीही औषधी म्हणून पेरू खाल्ल्यास चांगला परिणाम दिसून येतो. तसेच जन्मापासून असलेल्या आजारांना दूर करण्यासाठी फुलकोबी अत्यंत उपयोगी आहे. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फुलकोबी खुप महत्वाचा आहे.
त्याचबरोबर हाडे मजबूत करण्यासठी फुलकोबी अत्यंत उपयोगी आहे. गाजरात फॅल्केरिनॉल नावाचा एक फॅटी अल्कोहोल आढळून येते. तो कॅन्सरची शक्यता कमी करतो. तसेच गाजरामध्ये असलेले बीटा-कॅरोटिनही कॅन्सरच्या विरोधात शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते. सर्दी-खोकला यासारख्या समस्या नियंत्रित करण्यासाठी गाजराचे सेवन गुणकारी आहे. बीटा-कॅरोटिन नावाच्या घटकामुळे पांढऱ्या रक्तपेशी आणि टी सेल्सच्या संख्येत वाढ होते. ही वाढ प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप आवश्यक आहे. गाजरामुळे डोळे निरोगी राहतात. कारण गाजर अ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे. जेवणात अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेच डोळ्यांचा प्रकाश कमकुवत होतो. गाजरासह भरपूर अ जीवनसत्त्व असलेल्या खाद्य पदार्थांचेही सेवन करावे.