आरोग्यानामा ऑनलाईन टीम : मासिक पाळीच्या चक्रामध्ये अनियमिततेची कारणे प्रत्येक स्त्रीच्या वयानुसार वेगवेगळी असू शकतात. मासिकपाळी दर २५ ते २८ दिवसांनी येते. या चक्रामध्ये अनेक कारणांमुळे अनियमितता येऊ शकते. अनेकदा मुलगी वयात आल्यानंतर म्हणजेच पाळी सुरू झाल्यानंतर, तरूणपणात, तसेच स्त्रीयांच्या रजोनिवृत्तीच्या वेळी म्हणजेच पाळी बंद होण्याच्यावेळी ही अनियमितता आढळून येते. पाळी अनियमित होण्याची कारणे जाणून घेवूयात.
१ सुरूवातीला
ज्यावेळी मुलगी वयात येते म्हणजेच तिची पाळी सुरू होते त्यावेळी अनेकदा पाळीच्या चक्रामध्ये अनियमितता आढळून येते.
२ पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज (पीसीओडी)
बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वाढते वजन यांमुळे पीसीओडीचा त्रास वाढतो.
३ वाढलेले वजन
वाढलेले वजन आणि स्थूलपणामुळे पाळीमध्ये अनियमितता येते.
४ थायरॉइड
शरिरातील थायरॉइडच्या ग्रंथींमधून स्रवणाऱ्या हॉर्मोन्सच्या कमतरतेमुळे अनियमित पाळीचा त्रास उद्भवतो.
५ चाळीशीनंतर
पाळी जाताना म्हणजे रजोनिवृत्तीच्या काळात पाळीचे चक्र अनियमित होते.
Visit : arogyanama.com