आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बुद्धीमत्तेच्या बळावरच प्रत्येक व्यक्ती आपल्याला अपेक्षित उंची गाठण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, बुद्धीमत्ता कमी पडल्यास अपेक्षित ध्येय गाठण्यात त्यांना अनेक अडचणी येतात. याउलट काहीजण स्वत:ला खुपच बुद्धिमान समजत असतात. प्रत्यक्षात अशी स्थिती नसते. म्हणूनच असे लोक इतरांना खुप त्रासदायक ठरतात. स्वत:ची कुशाग्र बुद्धी ओळखायची असेल तर याची काही लक्षणे असून ही लक्षणे तुमच्यात आढळून येत असतील, तर तुम्ही बुद्धिमान आहात, असे समजण्यास काहीच हरकत नाही.
ही आहेत लक्षणे
१) बुद्धिमान लोकांच्या डोक्यात नेहमी वेगवेगळ्या विषयांवर अनेक प्रश्न येत असतात. आणि हे प्रश्न ते निर्भिडपणे विचारतात.
२) प्रश्न विचारतानाही ते विचारपूर्वक विचारण्याची क्षमता त्यांच्यात असते.
३) हे लोक आपल्या चुकांमधून शिकतात.
४) हे लोक कोणताही विषय किंवा मुद्द्यावर आपले अज्ञान स्वीकारतात.
५) ते भावनांच्या आधारे न बोलता, पुराव्यांच्या आधारे बोलतात.
६) अशा लोकांमध्ये सहानुभूतीची भावना अधिक असते.
७) बुद्धिमान लोक आपला जास्तीत जास्त वेळ वाचनात किंवा शिकण्यात घालवतात.
८) विविध ठिकाणाहून मिळालेली माहिती ते नेहमी एकत्र करीत असतात.
९) हे लोक एकाच जागी बसून उशीरापर्यंत काम करू शकतात.
१०) त्यांचा स्वभाव हा मनमोकळा असतो
११) अशा लोकांचे विचार खुले असतात.
१२) ते परिस्थितीशी जुळवून घेतात.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)