आरोग्यनामा ऑनलाइन टीम – इच्छा, आकांक्षांचे भूत आपणच मानेवर बसवून घेतो. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. याचा त्रास तुम्हाला स्वताला होतोच, शिवाय इतरांनाही होतो. यासाठी सर्वकाही माझ्याच मनासारखे झाले पाहिजे हा अट्टाहास प्रथम बाजूला ठेवला पाहिजे, तरच तुम्ही जीवन आनंदाने जगू शकता, असे अमेरिकेतील काही मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या अभयासातून समोर आले आहे.
हे लक्षात ठेवा
१. जे लोक टोकाचे आग्रही असतात, त्यांच्याबाबतीत बऱ्याचदा हा प्रकार होतो. अमूक गोष्टी अशी म्हणजे अशीच हवी, असे त्यांचे धोरण असते. त्यामुळे त्यांना स्वत:ला त्रास होतोच, तसेच इतरांनाही होतो.
२. माझ्यासारखे, काम इतर कोणालाही करता येत नाही, असे या लोकांना वाटते. एखाद्याने ती गोष्ट कितीही चांगली केली, तरी त्यांचे समाधान होत नाही.
३. आपल्या मनासारखी एखादी गोष्ट करायची तर ती त्याला स्वत:लाच करावी लागते. परंतु, एकटा माणूस किती गोष्टी करणार? हा प्रश्न उरतोच. यासाठी अट्टाहास सोडून इतरांवर त्या गोष्टी सांपवा. कारण अतिअट्टाहासामुळे सगळ्यांनाच त्रास होतो.
४. मीच चांगले करतो, माझ्याच मनासारखे, असा अट्टाहास करत असलेल्या व्यक्तींमुळे सर्व वातावरणच बिघडते. वातावरणात निगेटिव्हिटी, नकारात्मकता निर्माण होते.
५. यासाठी कोणत्याही गोष्टीचा टोकाचा आग्रह सोडा. साकल्याने विचार करा.
६. अट्टाहासाने तयार झालेल्या दुषित वातावरणात कोणतीच गोष्ट चांगली होत नाही. सकारात्मक विचार करणारेही या निगेटिव्ह एनर्जीकडे ओढले जातात.
७. कोणतीही गोष्ट उत्तमच व्हावी, हा आग्रह जरूर हवा, त्यासाठी प्रयत्नही आवश्य करावेत, पण किती ताणावे, कुठल्या टोकाला जावे याच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत.
८. मी पणा आणि अतिअट्टाहासामुळे होणारे नुकसान टाळायचे असेल तर टोकाचा आग्रह थांबवा. इतरांवर विश्वास टाका. विश्वास द्यायला शिका. यामुळे अनेक गोष्टी मार्गी लागतील.