आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पूर्ण आणि शांत झोप मिळणे अतिशय महत्वाचे आहे. तसेच किमान आठ तास झोप (Happy Sleeping) प्रत्येकाने घेतली तरच मानसिक आणि शारीरीक आरोग्य चांगले राहू शकते. चांगली झोप हवी असेल तर झोपताना मन प्रसन्न आणि आनंदी असावे (Happy Sleeping). कारण, झोपताना मनात राग किंवा चीड ठेवून झोपी गेल्याने त्या भावना लवकर विसरता येत नाहीत, असे चीन आणि अमेरिकेतील संशोधकांनी मिळून केलेल्या संशोधनात आढळले आहे. पुरेशी झोप झाल्यास मन प्रसन्न राहते.
हे लक्षात ठेवा
१) वादविवाद झाल्यावर लगेच झोपी गेल्याने त्याची नकारात्मक आठवण मनात कोरली जाते.
२) झोपण्याआधी कोणाशी भांडण झाले असेल किंवा खूप राग आला असेल तर तो शांत करून झोपा.
३) नकारात्मक भावना लाँग-टर्म मेमरीच्या भागात साठवल्या जातात, असे या संशोधनात आढळून आले.
४) या संशोधनामुळे पीटीएसडी रुग्णांवर परिणामकारक उपचार करणे शक्य आहे.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे